मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

. पाच कविता

1.
फूल उमलू लागले,
की मला उन्मळून येते
निर्माल्याच्या राशीत
आणखी एकाची भर पडते....

2.
या गावातील सा~या भिंती
दगडाच्या आहेत
भिंतीमधले दगड सोडले तर
सगळे दगडच आहेत!

3.
इथल्या बंगलीतल्या प्रत्येक बाबूला
खिडकीसाठी लागते अशी काच
जिच्यातून दिसते बाहेरचे स्पष्ट
आतले मात्र अजिबात!!

4.
कितीही खाल्लं तरी
त्याच्या अंगाला अन्नच लागत नाही...
लागणार कसं?
चमच्याशिवाय त्याच्या पोटात
अन्नाचा कणही जात नाही..

5.
माझे घेतलेले पैसे
कोणीच बुडविले नाहीत,
हा माझा अनुभव आहे!
ज्यांनी बुडविले,
ते पैसे माझे नव्हते
अशी माझी श्रद्धा आहे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा