सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

आकाश माती यांच्या काजळमायेचं नातं

AÉMüÉzÉ qÉÉiÉÏ rÉÉÇcrÉÉ MüÉeÉVûqÉÉrÉåcÉÇ lÉÉiÉÇ
iÉÑOûiÉÉ iÉÑOûiÉ lÉÉWûÏ
U£ümÉæÇeÉhÉÉcrÉÉ ÌlÉlÉÉSÉiÉ
eÉZÉqÉÉÇcÉÇ SåhÉÇ
ÌTüOûiÉÉ ÌTüOûiÉ lÉÉWûÏ

गुरुवार, २६ जानेवारी, २०१२

गणतंत्र / दोन कविता


कोणत्याही
प्रकारचे
नसलेले
ताळतंत्र : गणतंत्र


भावार्थ
हरवलेल्या
शब्दांचा
कलेवरी मंत्र : गणतंत्र

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

संकल्प-

अर्धे वर्ष सरत आले तरी
अजून मी वाचले नाही
माझे राशीभविष्य !!
विश्वास नाही, असे नाही
पण सवडच मिळाली नाही
कार्यव्यापात बुडून गेलेल्या या वर्तमानात
आता मी एक केला आहे संकल्प
संपूर्ण राशीभविष्य वाचून काढण्याचा
निदान नूतन वर्ष सुरू होण्यापूर्वी तरी...

शनिवार, २१ जानेवारी, २०१२

कवी / तीन कविता-


॥१॥

कवी : कविता करण्याचे काम करणारा.


॥२॥

कवी : काम करताना कविता करणारा.


॥ ३ ॥

कवी : कामाचीच कविता करणारा...

सोमवार, १६ जानेवारी, २०१२

तीन कविता कँल्क्युलेटरच्या-


इन-मिन-तीन रुपयांचा हिशोब मी
पाव-एक मिनिटांत दिला
पण माझ्यापेक्षा त्याचा विश्वास
कँल्क्युलेटरवरच अधिक दिसला...

२.
पूर्वी तो
बेरजेची सर्व गणिते
हाताच्या बोटांवरच असे करीत,
आजही तो तसाच हिशोब करतो
मात्र बोटे कँल्क्युलेटरवर नाचवीत...

३.
हातात कँल्क्युलेटर घेऊन
मोजू लागला तो
आकाशस्थ अगणित तारे-
आणि मग मोजता मोजता चमकू लागले
त्याच्या डोळ्यांपुढे-
आकाशस्थ अगणित तारे-

रविवार, १५ जानेवारी, २०१२

हे देवा-

हे देवा,
तू मला कावळा- चिमणी कर,
किडा-मुंगी कर,
गाढव, डुक्कर कर,
कुत्रा-मांजर कर,
कृमी-कीटक कर,
कोण हवे ते कर, काय हवे ते कर...तत्सम,
संस्कारशून्य, संस्कृतीशून्य...
कारण-
कारण त्यांना जगावे लागत नाही रे,
माणसांसारखे....

गुरुवार, १२ जानेवारी, २०१२

कणिका-

‘म्हणतात माऊली -’ येते आरंभाला
‘म्हणतात तुकोबा -’ शेवट हा ठरलेला
कीर्तनात अवघ्या बुडून जातो गाव...
संतांची वचने तेथे नित तो कथितो,
चुकुनहि ना कथितो, स्वत: काय तो म्हणतो...

मी, आम्ही, तुम्ही, तो, ती,ते अन त्याही-
कोणीच कधी वा येथ निधर्मी नाही
ही गाय, बैल वा घोडा, गाढव अथवा...
-शोधिता आढळे एक परंतु तैसा,
आढळे निधर्मी एकच - केवळ पैसा!!

त्वेषात धावले तिकडुनि ‘कुराण’ वाले
त्वेषात इकडुनि, तसेच ‘पुराण’ वाले
तलवारी, भाले, विळे, कोयते, ढाली...
मग परस्परांनी दिले-घेतले प्राण
मानवता हतबल, गलितगात्र, निष्प्राण!!

पूर्वीचे काही उरले नाही आता
ते प्रेम, जिव्हाळा,आत्मिय माया, ममता-
गाठते रसातळ अवमूल्यन मूल्यांचे...
संतांची वाणी घेते अंतिम श्वास
साबणाससुद्धा ये ना आता फेस...

मग उत्साहाने जावे धरण्या काही
हातास लागते उलटे काहीबाही-
हे नशिब तुटके, फुटके, विटके रकटे...
नववेलींवरची नवकुसुमे सुकुमार,
नजरेच्या स्पशे-सुकुनी, हो निर्माल्य!!

शेवटी हजारो लोकांच्या साक्षीने
घेतला पेट, क्षण गमले की गगनाने-
जन गर्जु लागले मोदे,‘रावण मेला!”
मग मनात आले रावण कसला मेला
होऊन ‘चिरंजिव आठवा’ आहे बसला...